loader image

नांदगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !

Oct 29, 2021


तालुक्यात मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावातील शेतकरी सखाराम कोंडाजी दराडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
५५ वर्षीय सखाराम दराडे हे शेतीचे झालेले नुकसान व कर्ज यामुळे गेल्या काही दिवसापासून चिंतेत होते, पावसामुळे तोंडाशी आलेले मका व कांद्याचे पिक संपूर्णपणे संपून गेले, लागलेला खर्च देखील संपूर्ण वाया गेला या तणावाखाली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येची बातमी कळताच गावकऱ्यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र...

read more
राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट...

read more
.