loader image
[ays_poll id=7]

मिशन १०० : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे !

Nov 1, 2021


शिवसेनेसाठी कायम प्रतिष्ठेची असलेली मुंबई महानगर पालिका पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा धडाका लावला आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीवर शिवसेनेने सर्व लक्ष केंद्रित केले असून युवा सेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात निवडणुकीची सर्व सूत्रे असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी पालिकेत पक्षाचे संख्याबळ वाढवायचे असून बंडखोरी टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत तसेच इच्छुकांची चाचपणी करण्यात येत आहे.

सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचे बहुमतांची गरज असलेल्या महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४ नगरसेवक आहेत. यावेळी सेनेने मिशन १०० चा नारा दिला आहे. सेना महाविकास आघाडीत असली तरी पालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहे. पक्षांतर्गत सूत्रे परिवहन मंत्री व सेना नेते अनिल परब यांच्या हाती असणार आहेत.

मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार असून सदस्य संख्या पूर्वीप्रमाणे २२७ इतकीच आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १५, जमातीसाठी २ तर ओबीसीला ६१ जागा राखीव आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुंबईत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार हे निश्चित आहे. 


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत...

read more
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम...

read more
खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी...

read more
.