loader image
[ays_poll id=7]

अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी; दिवाळी तुरुंगात जाणार !

Nov 3, 2021


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे.

13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सकाळी जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली व कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना कोठडी सुनावण्यता आली आहे.

त्यांचा खांदा निखळलेला आहे त्यामुळे त्यांना एक सहकारी देण्यात यावा, घरचं जेवण देण्यात यावं, त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांना कोविडची बाधाही झाली होती. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये अशी मागणी वकिलांनी केली होती. मात्र देशमुख हे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांना अनेक नोटीसा पाठवल्यानंतरही ते चौकशीला आले नाहीत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंतची कोठडी सुनावली.

6 नोव्हेंबरनंतर देशमुखांचे वकील हे देशमुखांच्या आजारपणाचं कारण देऊन त्यांना जामिनावर सोडण्याची विनंती करतील. आताही देशमुखांचे वकील जामिनासाठी अर्ज करतील. प


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत...

read more
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम...

read more
खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी...

read more
.