loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.