गोवा विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नवीन धोरण राबविण्यात आले आहे. यासाठी दोन इच्छूक उमेदवार असतील तर त्या इच्छुक उमेदवार निवडीसाठी भारतीय जनता पक्षाकडून तेथील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल पदाधिकारी, मंडल समीती, महीला मोर्चा कोर टीम, सर्व आघाडीचे अध्यक्ष व सरचिटणीस या सर्वाना मतदान पेटीत कोणाला उमेदवारी दिली पाहीजे यासाठी मतदान करावे लागले. यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रीया ही लोकशाही पध्दतीने गोवा राज्यामध्ये राबवीली जात आहे. यामध्ये बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांचे महत्व भविष्यात वाढणार असून तिकीट वाटपानंतर होणाऱ्या नाराजी पासूनही नेत्यांचा बचाव होणार असल्याचे मत काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
NHAI ला भुजबळांचा ३१ ऑक्टोंबर चा अल्टीमेटम ; टोल बंद करण्याचा दिला इशारा
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद...











