कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाजाच्या धर्तीवर शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्यात यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक नुकसान टाळावे अशी मागणी आध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र शासन तथा मुख्यमंत्री,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,शालेय शिक्षणमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात केले आहे.
कोरोना नंतर ओमीक्रोन संसर्गाच्या करणास्थाव सरसकट शाळा महाविद्यालय ऑनलाईन शिक्षणाच्या भरवशावर बंद करण्यात आली आणि इतर सर्व आस्थापना सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाज त्याच प्रमाणे
सार्वत्रिक निवडणुका चालू आणि शिक्षण शाळा महाविद्यालय ३०-३५ पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद परंतु मंदिर चालू ज्ञान मंदिर बंद मधूशला चालू शाळा बंद चित्रपटगृह,व्यापार,व्यवसाय चालू व शाळा बंद असे निर्णय आपण घेतले आहेत यातून उद्याच्या भारताचे चित्र काय असेल ? याचा विचार करावा,विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपक्रम, प्रकल्प अथवा हस्त पुस्तिका स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात तसेच ऑनलाईन शिक्षणाला पर्याय द्यावा अशी मागणी सरकारकडे शेजवळ यांनी केली आहे.
जागतिक स्थरावर कोरोना अथवा ओमीक्रोन संसर्गाचा मृत्यूदर कमी आहे अशी आकडेवारी सातत्याने मांडली जात आहे.
ह्या संसर्गाबद्दल लोकजागृती व सरकारी नियमांचे पालन हि शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय अस्थपना पालक शिक्षक व विद्यार्थी यांची जबाबदारी आहे त्यांनी ती स्वीकारली आहे परंतु गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या निमित्ताने सरसकट शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांनचे जे शैक्षणिक,मानसिक नुकसान होत आहे हे कसे भरून निघणार पुढे अध्यापन न करता परीक्षा न घेता मुलांना कसे घडवले जाणार आपण कोणती समाज व्यस्था कसे राष्ट्र निर्माण करणार ? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
सरसकट शाळा महाविद्यालय बंद करून राज्य व राष्ट्र शैक्षणिक अपंग केले जात आहे.याचा विचार करून कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाजाच्या धर्तीवर शाळा-महाविद्यालय नियमित सुरू करावे असे विनंती आवाहन निवेदनाद्वारे ऍड.अरुण दोंदे,एस.एन.वाघ,प्रा.के.एस.केवट,वनिता सरोदे,विनोद पानसरे,नुमान शेख,दीपक शिंदे,सुभाष वाघेरे,अमीन शेख,,ज्ञानेश्वर कोकाटे,राजरत्न वाहुळ,अक्षय गरुड आदींच्या वतीने करण्यात आले आहे.
योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम
ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम...










