loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी आदेश लागू !

Jan 19, 2022


नाशिक जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले, धरणे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे. हा आदेश काल (दि. 19) पासून लागू झाला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो कायम राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिली.

या आदेशानुसार ब्रह्मगिरी व अंजनेरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, हरिहर, पहिने, साल्हेर किल्ले, भास्करगड व रामशेज किल्ला, भावली आणि वैतरणा धरण, गंगापूर धरण या सर्व ठिकाणी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 व भारतीय दंड संहिता-1860 कलम 188 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान राज्यशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दि. 14 जानेवारी रोजी बैठक होऊन त्यात नाशिक जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता वरील सर्व पर्यटनस्थळे, किल्ले व धरणांवर पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना अनिश्‍चित काळासाठी जमावबंदी व संचारबंदीचे निर्देश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश फक्त शासकीय सेवा व अत्यावश्यक सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना लागू राहणार नाहीत.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.