मनमाड शहराजवळील हाडबिची शेंडी या सुळक्यावर २ फेब्रुवारी रोजी अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने आरोहण व प्रस्तरारोहण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रस्तरारोहण करताना इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुप चे मुख्य गिर्यारोहक मयूर दत्तात्रय म्हस्के आणि अनिल शिवाजी वाघ या दोघांचा मृत्यू झाला होता.या घटनेची गंभीर दखल पर्यटन संचालनालय कार्यालयाने घेतली असून नगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपला नोटीस बजावली असून संदर्भाकित शासन निर्णय अंतर्गत नोंदणी केली आहे का? केली असल्यास नोंदणी पत्रक सादर करण्यास कळविले आहे तसेच आयोजकांनी ट्रेकिंग चे अधिकृत प्रशिक्षण घेतले आहे का? असा सवाल ही उपस्थित करण्यात आला आहे.ट्रेकिंग साठी वापरण्यात आलेली सुरक्षा साधने कोणती होती व साधनांची उपयोगिता कधी पर्यंत होती? सुरक्षेसाठी कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या व संदर्भिय शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे व बंधनकारक बाबींचे पालन झाले आहे का? आदी सर्व मुद्यांचे दोन दिवसात स्पष्टीकरण मागितले असल्याचे कळते. सदर दुर्घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी साहसी गिर्यारोहणाचे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ माजली आहे.
योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम
ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम...










