एसटी बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या निधीतून एसटीच्या ३०० बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.त्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थिनींचा एसटी प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.











