loader image
[ays_poll id=7]

महाविद्यलयीन विद्यर्थ्यांसाठी खूशखबर, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ

Apr 14, 2022


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे. मागील दीड वर्ष शाळा, कॉलेज ऑनलाईन परीक्षा घेत होत्या. मग या वर्षी देखील परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. आज कुलगुरूंच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यत आला आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल) 2022 या परीक्षेपुरता असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. आज झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या ऑफलाईन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढविण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. त्याप्रमाणे शिक्षण सुरूही झाले. परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू असताना त्यामध्ये लिखाणाचा सराव होत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हातातील पेनाची जागा कम्प्युटर किंवा मोबाइलने घेतली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.