loader image
[ays_poll id=7]

संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा चढताच; पुढील ५ दिवसात येऊ शकते उष्णतेची तीव्र लाट

Apr 29, 2022


महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. तर आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. आगामी ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याआधी अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी सावधानतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अनेक भागात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. अनेक ठिकाणी सरासरी तापमान हे ४० डिग्री सेल्सिअस इतके आहे. सर्वाधिक अशा तापमानाची नोंद ही ब्रम्हपूरी, वर्धा, अकोला आणि जळगाव येथे झाली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होता. राज्यात अकोल्यात सर्वाधिक अशी ४५.४ इतकी तापमानाची नोंद झाली. याठिकाणी ०.६ डिग्री सेल्सिअस अशी एकाच दिवसात झालेली वाढ आहे. विदर्भात सर्वाधिक अशा तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यात झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक अशी तापमानाची नोंद झालेली आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.