विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर शिवसेनेचे मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत तब्बल ३६ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यासोबत असलेल्या माहविकास आघाडी सोबत काडीमोड करावी व भाजपा सोबत सरकार स्थापन करावे या मुद्द्यावर बंड पुकारत सत्तेची समीकरणे बदलू शकतात व येत्या २,३ दिवसात काहीही घडामोडी होऊ शकतात. गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी नामदार शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयघोषाच्या घोषणा देत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कपणे असल्याचे सूतोवाच दिले.
नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
शनिवार दि. 12.04.2025 नांदगांव: मारुती जगधने – महाराष्ट्र शासनाच्या शंभर...










