loader image
[ays_poll id=7]

गिरणा धरणाच्या ६ (सहा) दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

Jul 17, 2022


नांदगाव : नाशिक जिल्हातील सर्वात मोठे धरण व उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवण क्षमता असलेले व  ओळखले जाणारे `गिरणा धरण’ हे ९२ % भरले असून धरणाचे ६ (सहा ) वक्रदरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहे.
नांदगाव, मालेगांव, चाळीसगाव या तालुक्यातील जनतेची तहान भागविणारे म्हणून या धरणाची ओळख निर्माण आहे.
चणकापूर, हरणबारी  धरणातून पाण्याचा विसर्ग  सुरु असल्यामुळे गिरणा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. काल दुपारी १२ वाजता धरण ९२ टक्के भरले. यानंतर तात्काळ धरण सुरक्षितततेच्या दृष्टीने वरून येणारे जास्तीचे पुराचे पाणी गिरणा नदीत पात्रात सोडण्यात आले आहे.
गिरणा धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. या दोन्ही दरवाजांमधून नदीपात्रात एकूण ७१२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या नदीत होत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असेही याप्रसंगी सांगण्यात आले. नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नदीकडे जाऊ नये, तसेच गुरेढोरे नदी जवळ नेऊ नये ,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेआहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवण क्षमतेच्या गिरणा धरणाचे एकून ६ (सहा) दरवाजे १फुटा ने उघडण्यात आले, २१ हजार ५०० दक्षलक्ष साठवण क्षमता असणारे हे धरण आहे.
गिरणा धरणातून ७१२८ क्युसेस  पाण्याचा विसर्ग आता गिरणा नदीत सुरू झाला असून धरणाच्या आवकेत होणाऱ्या वाढीवरून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले. गिरणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सातर्कतेचे आदेश देण्यात आले. गिरणा धरणावरील थेट पाणीपुरवठा योजनेद्वारे मालेगाव, चाळीसगाव व नांदगाव शहरासह दहीवाळ तसेच २५ गावे जोडली गेली आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १५४ ग्रामपंचायती या पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणाधरण म्हणून ओळखले जाते.
धरण परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.