loader image
[ays_poll id=7]

बळीराजाला मिळणार नुकसानभरपाई : शिंदे सरकारने जाहीर केली मदत

Sep 9, 2022


कोरोना मुळे दोन वर्षे उत्सव साजरे करण्यावर बंधने होती मात्र यंदा बाप्पांचा उत्सव राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असतानाच,दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. शिंदे सरकारने राज्यातील सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यात मराठवाडा विभागाला १ हजार ८कोटींची भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

अशी आहे जिल्हानिहाय मदत

जिल्हा     मदत     बाधित क्षेत्र
जालना –  ३ कोटी ७१,८४,००० – २३११.७९
परभणी – 1 कोटी ६०,३४,०० – ११७९
हिंगोली – १५७ कोटी ४,५२,००० – ११३६२०
नांदेड – ७१७ कोटी ८८९२००० – ५,२७,४९१
लातूर – ३७ कोटी ३०.८३ – २७.४२५
उस्मानाबाद – ९० कोटी ७४,३६,००० – ६६७२३

दोन दिवसांत मदत मिळणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची घोषणा करतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्याच्या मदतीसाठी नुकसानभरपाईचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत...

read more
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम...

read more
खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी...

read more
.