loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा

Sep 18, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे आज दि.16 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करून जागतिक ओझोन दिन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.याप्रसंगी मॅंनग्रौ फाउंडेशन, मुंंबई (Mangrove Foundation, Mumbai) येथील पर्यावरणप्रेमी व कासवमित्र प्रा. मोहन दत्तात्रय उपाध्ये हे प्रमुख वक्ते होते. आपल्या मनोगतातून त्यांंनी पृथ्वीवरील परिसंस्था व जैवविविधता यामध्ये असणारे कासवांचे महत्त्व हे चित्रफितीद्वारे सादर केले. कासवांची जीवनमान शैली, प्रज्योत्पादन क्षमता, कासवांचा अधिवास याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर पर्यावरणामध्ये कासवांचे असणारी महत्त्वाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जागतिक ओझोन दिन का साजरा केला जातो. तसेच ओझोन थराचे महत्त्व, मानवाची पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागाचे प्रा. डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. रोहित शिंदे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुरेश पगार, प्रा. देविदास सोनवणे व प्रा. कॅप्टन प्रकाश बर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील कु. ज्ञानेश्वरी चंद्रात्रे या विद्यार्थिनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय द्वितीय वर्ष कला या वर्गातील भूगोल विभागाची विद्यार्थ्यांनी कु. गायत्री शिंदे या विद्यार्थिनींनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील कु. साक्षी सांगळे या विद्यार्थिनीने केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
.