loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील लेंडी नदी वरील मुख्य पुलाच्या मोऱ्या कचरा व घाणीने बंद

Sep 19, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहर व परिसरात काल रविवार संध्याकाळ पासून जोरदार पाऊस चालू असून शाकांबरी नदीला पुर आलेला असून लेंडी नदीला सुद्वा पाणी वाढलेले आहे .

शाकाबंरी नदीवरील नगरपालिकेच्या मागील पादचारी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पुल वाहतूकीला बंद करण्यात आला आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या लेंडी नदीला सुद्वा पुर आला असून या नदीला येवला रोड कडील मल्हारवाडी येथील डोंगराचे पाणी मोठया प्रमाणावर येत असून हया पाण्यामुळे नदीला पुर आला आहे .


नांदगाव नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून लेंडी नदीच्या पुलावरील अतिक्रमणे हटविली तसेच रेल्वे सब वे जवळील मटन मार्केट पाडले . पण येथील विस्थापितांची कुठेही व्यवस्था केली नाही . मटन मार्केट मधील सर्व व्यावसायकांनी रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने रहदारीला मोठा अडसर निर्माण झाला आहे.
लेंडी नदी पुलावरील अतिक्रमणे हटविली पण पुलाखालून पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्या साफ केल्या नाही . या मोऱ्या मध्ये मोठया प्रमाणावर भाजी माक्रेट चा कचरा अडकलेला आहे. त्यामुळे हे पाणी शहरात शिरू शकते अशी परिस्थीती तयार झाली आहे.
लेंडी नदीच्या मुख्य उगमा वर आज तरी पाऊस कमी असल्याने दहेगाव धरण अद्याप भरलेले नाही . दहेगाव धरण आज मितीस ७० % भरलेले आहे. पाऊसाचे वातावरण पहाता दहेगाव धरण केव्हाही भरू शकते . हे धरण भरल्यावर नदीला मोठा पुर येवू शकतो .
नगरपालिका केवळ रिक्शामधून माईक द्वारे सावधानतेचा इशारा देत आहे. पण याच लेंडी नदीवरील पुला तून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देत नाही.
शहराच्या मुख्य बाजारपेठेत व मध्य वस्तीत येण्यासाठी येणारे रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झालेले आहे . रेल्वे गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भोंगळे रोड वरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडे, मच्छी व मटनाची दुकाने भाजीपाला वाले यांनी मोठया प्रमाणावर अडचण निर्माण केली आहे. भोंगळे रोड वरील नगरपालिका शॉपिंग सेंटर समोर तर वेल्डींग दुकानदारानीं रस्त्यावर आपली दुकाने थाटली आहे.

नगरपालिका पुरस्कृत अतिक्रमण

या अतिक्रमीत व्यावसायीकां कडून नगरपालिका रोज पावती द्वारे कर वसूल करीत असून हे अतिक्रमण नगरपालिका पुरस्कृत असल्याचे वाटते .
नगरपालिका हद्दी तील चांडक प्लॉट,भोलेनगर, इंद्रायणी नगर,अब्दुल करीमशेट चाळ,विजय ऑईल मिल,शिंदेवस्ती या भागातील रहिवाशांना शहरात येण्यासाठी कुठूनही रस्ता राहिलेला नाही .


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.