loader image
[ays_poll id=7]

श्रद्धा वालकर हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ; आफताब पुणवाला ला मरेपर्यंत फाशीची मनमाड मनसे ची मागणी

Nov 21, 2022


महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने येथील मनमाड शहर पोलिस स्थानकात श्रद्धा वारकर ह्या वसई येथील मुलीची आफताब पूनावाला ह्याने केलेल्या निर्घृण हत्ये संदर्भात निवेदन देत श्रद्धा हिला न्याय देण्याची मागणी केली.

निवेदनाचा आशय असा,भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी नराधम अफताब यानेकु. श्रध्दा हिच्यावर केलेल्या अत्यंत अमानवीय कृत्याने संपूर्ण देश हदरलेला आहे. भारतातल्या अशा नराधमांना इरान, इराक व सौदीअरब सारख्या देशामध्ये बळजबरी बलात्कार व हत्यासाठी ज्या प्रकारे सार्वजनिक ठिकाणी जनतेसमोर शिक्षा दिली जाते अशा शिक्षेमुळे त्या ठिकाणी गुन्हेगारांनवर जबर जरब बसतो, त्याच प्रमाणे भारतात देखील अशा कृत्यांसाठी अशी कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे त्यानेच समाजातीलअमानविय औलादिंवर जरब बसु शकतो.

ज्या प्रकारे अफताब अमिन पुनावाला याने कुमारी श्रध्दा वालकर हिला लव्ह जिहादच्या खोट्या प्रेमाच्या जळात अडकवून ज्या प्रकारे तीचा क्रुर व अमानुषपने हत्या करून तीच्या शरीराची अवहेलना करुण ३५ तुकडे केले व त्या अवशेषांना वेगवेगळ्या ठिकाणी फेकुन पुरावा नष्ट करण्यात आला. अशा नराधमाने केलेल्या अमानवीय व अत्यंत कृर कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनो अत्यंत कठोर कडवट व जळजळीत निषेध करीत आहे.

कुमारी श्रध्दा वालकर हिला मरनोत्तोर न्याय मिळावा यासाठी सदरच्या घटनेचा संपूर्ण तपासअत्यंत जलद गतीने पुर्ण करावा

१) सदरची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करुन चालवावी

२) सदरच्या केससाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकीलाची नियुक्ति करावी

३) सदरच्या केसचा ३ महिण्याच्या आत निकाल लावुन नराधम अपराधी अफताब या विकृतास मरेपर्यंत फाशी देण्यात यावी.

हिच कुमारी श्रध्दा वालकर हिला आपल्याकडून खरी श्रध्दांजली असेल……! असे निवेदन शहर प्रमुख सचिन शिरुड तसेच एड.निखिल रामचंद्र परदेशीनांदगाव ता.संघटक जनहित कक्ष यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिले. ह्या प्रसंगी महिला तालुका उपाध्यक्ष कल्पनाताई दराडे,महिला शहराध्यक्ष रोहिणीताई गागरे,सचिनभाऊ बाविस्कर, पवनभाऊ दराडे रावसाहेब गरुड, शंकरभाऊ आंधळे संदीपभाऊ पांडव, सुनीलभाऊ चव्हाण,योगेशभाऊ आहेर,सागर चव्हाण,अनु विश्वास, दुर्गेश सांगळे, आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
.