loader image
[ays_poll id=7]

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

Sep 19, 2026


पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला तरी बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीवर उपाययोजना करण्या संदर्भात तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत दुष्काळ आढावा बैठक घेतली.

बैठकीत जनावरांचा चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करनेकामी प्रस्ताव शासनास सादर करणे, पीक पंचनामे, वाडेवस्त्यांवर पाणी टँकर व्यवस्था, पीक विमा भरपाई तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणेबाबत आमदारांनी सूचना केल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे वास्तुनिष्ठ आणि सत्य अहवाल तयार करून आनेवारी 50% च्या आत दाखवावी, याबाबत निर्देश देखील दिले. वेळेप्रसंगी शेतात जाऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आ.कांदे यांनी केले.

बैठकीला प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, मनमाड व नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामसेवक तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, विविध पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
.