loader image
[ays_poll id=7]

मनमाड – चांदवड / चांदवड – मनमाड अतिरिक्त बसेस सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Nov 22, 2022


कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यापासून शैक्षणिक विभागातर्फे शाळा व कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. मनमाड शहरातून जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षणासाठी मनमाड ते चांदवड रोज अपडाऊन करतात. बस आगाराच्या वतीने त्यांना मासिक पास देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, परंतु चांदवड जाण्यासाठी व परत येण्यासाठी मुबलक बस फेर्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार काही पालकांद्वारे केली जात होती, याची दखल घेत मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनमाड आगार व्यवस्थापक यांना निवेदन देत सदर बाब त्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. सदर प्रश्न त्वरित मार्गी लावत सकाळी जाण्यासाठी व संध्याकाळी परत येण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था उच्च अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन लवकरच सुरु करण्यात येथील असे आश्वासन आगार व्यवस्थापक यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, माजी नगराध्यक्ष प्रकाश बोधक, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अल्प.शहराध्यक्ष अमोल काळे, संदीप पाटील, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, प्रफुल निकम, नितीन आवारे, नितीन दंडगव्हाळ, आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
.