loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र पोलीस भरती – १८३३१ पदांसाठी १२ लाखाहून जास्त अर्ज

Dec 3, 2022


मंगळवारी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीचा अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील 18 हजार पदांसाठी मंगळवापर्यंत 12,5000 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर मुंबईत सात हजार पदांसाठी चार लाख 29 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
वाढत्या बेरोजगारीमुळे या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर एवढी मोठी भरती आल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. शासनातर्फे 18 हजार 331 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मंगळवार पर्यंत राज्यभरातून 12 लाख 25 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे. तर त्यातील 1,500000 अर्जदारांनी शुल्क भरले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रत्येक पदासाठी सरासरी 67 उमेदवारांनी अर्ज केला आहे.या पदासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट असल्याने सुमारे 14 लाख अर्ज येणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यानी म्हटले आहे. मात्र अर्ज करणारे जवळपास 55 टक्के उमेदवार पदवीधर असल्याचे समोर आले आहे.
15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरू शकता

ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने पोलीस भरतीचे अर्ज भरण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबर पर्यंत पोलीस भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.