गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रेल्वेची धडक बसून ३ जणांचा मृत्यू झाला,यामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मृत तिघांची ओळख पटली आहे. डीसीपी ग्रामीण झोन डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी आणि दोन युवक रील बनवत असल्याची माहिती स्टेशन मास्टरकडून मिळाली होती. त्यानंतर भरधाव वेगात येणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेस गाडीने धडक दिल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक
मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...








