loader image
[ays_poll id=7]

ऊर्जामंत्र्यांची मध्यस्थी सफल – वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

Jan 4, 2023


महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३२ संघटनांशी चर्चा केली, त्यानंतर कर्मचारी संघटना प्रतिनिधी संजय ठाकूर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. दरम्यान, संप मागे घेतल्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळून वीज पुरवठाही सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अदाणी वीज कंपनीने महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना देण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदाणी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, याला वीज कर्मचाऱ्यांच्या विरोध होत आहे. कामगार संघटनांशी सरकारने चर्चा केली, मात्र चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या. यासह इतर काही मागण्याबाबत वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. यावेळी फडणवीस म्हणाले, ३२ संघटनांशी तीन ते चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही संघटना होती. राज्य सरकारला कोणत्याही कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही. याउलटं पुढील ३ वर्षांमध्ये वीज कंपन्यांमध्ये सरकार ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्था उभी करण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.

समांतर परवान्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महावितरण आणि सरकारने हे अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवेत अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली. राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसंच कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम :

दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा परिणाम राज्यात जाणून आला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान महावितरणसमोर उभं ठाकलं होतं. कामगार संघटनांनी बेकायदा संप सुरू न ठेवता तो त्वरित मागे घ्यावा. संप करणाऱ्यांवर मेस्मा कायदा लागगू करण्याची वेळ आणू नये, असा इशारा महावितरण आणि राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला होता.


अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
.