loader image
[ays_poll id=7]

नांदगावचे गवळी आणि कांबळेंची मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी निवड

Jan 7, 2023


वर्धा येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी नांदगाव येथील गझलकार काशिनाथ गवळी आणि रविंद्र कांबळे यांची निवड झाली आहे. संमेलन दि. ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून तीनही दिवस गझल कट्ट्यावर मुशायरे होणार आहेत. यात पहिल्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्घाटन समारोहानंतर दुपारी २ वाजता गझल कट्ट्याचे उद्घाटन होईल आणि मुशायऱ्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी साधारणतः पाच-सहा मुशायरे होणार असून यात प्रामुख्याने विदर्भातील गझलकारांचा सहभाग राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार, दि. ४ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान आठ ते दहा मुशायरे होतील. तर समारोपाच्या दिवशी दि. ५ फेब्रुवारीला पुन्हा पाच-सहा मुशायरे होतील. या दोन्ही गझलकारांचे व कवितेसाठी कवयत्री प्रतिभा खैरनार यांची कविता वाचनासाठी निवड झाली आहे .
त्यांचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगांव तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.