loader image
[ays_poll id=7]

अशोक सराफ दक्षिण भारतात असते तर आज मुख्यमंत्री असते – राज ठाकरे

Jan 9, 2023


मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील ह्या कार्यक्रमालाउपस्थित होते. राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे कौतूक केले करतांना ते म्हणाले की अशोक सराफ दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री असते.
“अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. अशोक सराफ हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते. ४०-४० फूट उंचीचे त्यांचे कटआऊट लावले असते. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काहीही नाही. कलावंत आहे का. मग ठीक आहे, एवढे बोलून आपल्याकडे विषय संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
“परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळे असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणे सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते,” असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.


अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...

read more
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...

read more
बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

नांदगांव : मारुती जगधने पांझण (धोटाणे) ता नांदगाव येथील ग्रांमपंचायतीने गावातील महीलासाठी बांधलेले...

read more
.