loader image
[ays_poll id=7]

इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करावी – समता परिषदेची मागणी

Jan 10, 2023


नांदगाव ( प्रतिनिधी) बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मागणीचे निवेदन नांदगाव तालुका अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील व समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदगाव तालुका तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांना दिले. नुकतीच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातीनिहाय जनगणना सुरु झाली आहे.तामिळनाडु, छत्तीसगड आणि इतर राज्यांनी सुध्दा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झाला आहे.महाराष्ट्रात ही जातीनिहाय जनगणना करावी. अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.जनगणना हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे.मात्र इतर मागास वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे.त्यामुळे राज्य सरकारने बिहार सरकार प्रमाणे ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नांदगाव तालुका समता परिषद अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील,विजय पाटील,शहर अध्यक्ष अरुणभाऊ पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सुरज पाटील,प्रतिक कोरडे,शंकर शिंदे, सचिन भिका जेजुरकर , सोमनाथ शिरसाठ, सुनील खैरनार, हिम्मत जाधव, संदिप शिंदे, रविंद्र आहेर, भाऊसाहेब महाजन, माणिक बाविस्कर, अशोक शंकरराव पाटील, रितेश जाधव, बाबासाहेब जेजुरकर, बाळासाहेब खैरनार, दत्तात्रय खैरनार, मुकेश खैरनार,मज्जुभाई शेख,विशाल पाटील, जगदीश सुरसे,निंबा क्षिरसागर,देवदत्त सोनवणे, जयवंतराव सुरसे, मंजुर गफ्फार शेख, सलमान पठाण,किरण शिंदे,संपत पवार,बापू बिन्नर,सुगंधाबाई खैरनार,प्रशांत बोरसे, फौजभाई शेख, शुभम बोरसे,गैसुभाई मिस्तरी आदी यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.