loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आदित्य ठाकरे

Feb 8, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजरात ला जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.
असल्याचा आरोप शिवसेनानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसंवाद यात्रा निमित्ताने नांदगाव येथील जैन धर्म शाळेत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते..

यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,अद्वय हिरे .जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..
शिवसेना नेते व माजी मंत्री  आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजराल जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.तसेच आज मी राज्यात जिथे फिरत आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन जनता आम्हाला प्रतिसाद देत आहे. मात्र गद्दार जिथे जातात तिथे जनता त्यांना उभे करत नाही. आजच्या सभेला महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात दिसून येत आहे . शिवसेना एकच असून एकच राहणार आहे. संपूर्ण राज्य महाविकास आघाडीसोबत उभे आहे. ज्यांनी गद्दारी केली ते जनतेला पटलेले नाही. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेची जी सेवा केली, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राचे नाव अग्रस्थानी राहिले. खोकेवाल्यांच्या सभा बघा व आमच्या सभा बघा. आमच्या सभेला जनता स्वतःहून येते व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगतात.. पारंपरिक मतदार शिवसेनेसोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 
यावेळी अल्ताफ खान, अव्दय हिरे
गणेश धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.