loader image
[ays_poll id=7]

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

Feb 12, 2023


मनमाड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशा आशयाचे निवेदन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे मनमाड पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असतो. लोकशाहीच्या सरंक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेची कायमच महत्वाची भुमिका राहिलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशभरात हुकूमशाही प्रवृत्ती या पत्रकारितेवर अंकुश ठेवू पहात आहेत.पत्रकारांवरील हल्ले आणि दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू मांडतांना जनहिताला सतत प्राधान्य देणे हे पत्रकार आणि पत्रकारितेचे कर्तव्यच आहे. अशीच पत्रकारिता करणारे राजापूर (ता. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. विरोधात बातमी दिली या रागातून शशिकांत वारिके यांना संपविण्यात आले आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेवर केलेला हल्लाच असून आम्ही सारे पत्रकार याचा तीव्र निषेध करीत आहोत.देशातील लोकशाहीचा गळा घोटणारा हा प्रकार असून या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि शशिकांत वारिके यांना न्याय मिळावा. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. जेणेकरून अशा घटनांना भविष्यात पायबंद बसेल. पत्रकारांच्या जीवीताचे आणि पर्यायाने पत्रकारितेचे संरक्षण व्हावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, निलेश वाघ, अशोक बिदरी, नरहरी उंबरे, सतीश शेकदार, उपाली परदेशी, योगेश मस्के, गणेश केदारे, नाना आहिरे, अफरोज अत्तार, तुषार गोयल, आनंद बोथरा, अनिस शेख आदींनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.