loader image
[ays_poll id=7]

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

Feb 12, 2023


मनमाड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशा आशयाचे निवेदन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे मनमाड पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असतो. लोकशाहीच्या सरंक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेची कायमच महत्वाची भुमिका राहिलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशभरात हुकूमशाही प्रवृत्ती या पत्रकारितेवर अंकुश ठेवू पहात आहेत.पत्रकारांवरील हल्ले आणि दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू मांडतांना जनहिताला सतत प्राधान्य देणे हे पत्रकार आणि पत्रकारितेचे कर्तव्यच आहे. अशीच पत्रकारिता करणारे राजापूर (ता. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. विरोधात बातमी दिली या रागातून शशिकांत वारिके यांना संपविण्यात आले आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेवर केलेला हल्लाच असून आम्ही सारे पत्रकार याचा तीव्र निषेध करीत आहोत.देशातील लोकशाहीचा गळा घोटणारा हा प्रकार असून या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि शशिकांत वारिके यांना न्याय मिळावा. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. जेणेकरून अशा घटनांना भविष्यात पायबंद बसेल. पत्रकारांच्या जीवीताचे आणि पर्यायाने पत्रकारितेचे संरक्षण व्हावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, निलेश वाघ, अशोक बिदरी, नरहरी उंबरे, सतीश शेकदार, उपाली परदेशी, योगेश मस्के, गणेश केदारे, नाना आहिरे, अफरोज अत्तार, तुषार गोयल, आनंद बोथरा, अनिस शेख आदींनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.