समाजाच्या तळागाळापर्यंत समाज जागृती करण्याची गरज – फिरोज शेख यांचे
नांदगाव – भारतीय ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांक सामाजिक संघटनेचे संस्थापक तथा फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी नांदगांव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विचार व्यक्त करताना आपण आपल्या समजाला जागृत करण्याची ही काळाची गरज असून, समाज बांधवांनी एकत्र येऊन सकारात्मक विचार दृष्टीकोनातूनच समजाला पुढे नेण्याची हीच वेळ योग्य असल्याचे नमूद करीत तळागाळातील समाज घटकां पर्यंत शासकीय योजने अंतर्गत येणाऱ्या सवलती कशा प्रकारे पोहचतील, येणाऱ्या अडचणीना कसे सामोरे जावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या अनेक योजने पासून समाज अनभिज्ञ असून लवकरच या संदर्भात जिल्हा पातळीवर मेळाव्यात वरिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन शिबिरा सोबत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,क्षेत्रात योगदानाबद्दल उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तीचे सत्कार लवकरच आयोजित करण्याचे मानस असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेची कास धरून समाजाला प्रेरणा घेवून प्रगती साध्य करावी लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी फिरोज शेख यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शरीफ शेख, पत्रकार अभिषेक ईघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नासिर पठाण. शाकीर पठाण, समिर पठाण,अमीन पठण, अरबाज शेख, आरिफ मोमीन उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.
मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...








