loader image
[ays_poll id=7]

शासनाने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे – ६०० रुपये देण्याची शेतकऱ्याची आर्त हाक

Mar 15, 2023


कातरवाडी ताः चांदवड येथील शेतकरी भागवत झालटे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची रक्कम प्रति क्विंटल रुपये ६०० करण्याची मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक वाया गेले आहे. शेतकरी संपावर गेल्यावर सगळं महाग होईल कुठलाही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा बाजारात येऊ दिला जाणार नाही दूध व सर्व पालेभाज्या त्यामुळे सरकारने लवकरात लवकर विचार करून भाव निश्चित करावे आणि अनुदान रू.600 जाहीर करावे सोयबीन, कापूस, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी ४००-५०० रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ६00 रुपये करावे, अशी मागणी शेतकरी सामाजिक कार्यकर्ता भागवत झाल्टे यांनी केली आहे. शेतकरी वारंवार असमानी सुलतानी संकट सापडत आहे त्यात चांदवड तालुक्यातील गावामध्ये नुकसान भरपाई चे पैसे मिळत नाही फक्त शेजारी देवल्यातच मिळतात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्या पिकावर नांगर रोटर फिरवत आहे भाजी पाला हि कवडीमोल भावात विकला जात आहे अतिवृष्टीमुळे खरिप वाया गेला आणि आता पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कांद्याने तर यावेळी शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी ११०० ते १२०० रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासच विंटलला ३०० रुपये लागतात हा खर्च पाहता सरकारने जाहीर केलेले ३०० रुपयांचे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर सरकार मेहरबान असल्याचे चित्र दाखवण्यात आले. घोषणाच घोषणा करण्यात आल्या आहेत प्रत्यक्षात मात्र हे सरकार शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेत दिसून आले आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करून किमान ६००.रु प्रमाणे कांद्याला अनुदान द्यावे.

एक शेतकरी भूमिपुत्र श्र भागवत राजाराम झाल्टे कातरवाडी तालुका चांदवड


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.