loader image

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

Apr 13, 2023


नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी बुधवारी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पिकांची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वतीने जातेगांव येथील माजी सरपंच नारायण पवार यांनी गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे कांदा, मका, आंबा, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसानी बाबत व्यथा मांडली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना. दानवे म्हणाले की, चांदवड, मनमाड, नांदगाव तालुक्यात द्राक्ष, कांदा व टोमॅटो आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने १००% नुकसान झाले असून शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे.
शासनाने सर्व निकष बाजूला सारून पंचनाम्याची वाट न बघता तात्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे शेतकरी बांधवांच्या वतीने मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच लाल कांद्याला प्रती क्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले असून त्यासाठी ७/१२ उतार्यावर ऑनलाईन पिकपेरा असणे गरजेचे आहे, व एका शेतकऱ्याला २०० क्विंटल कांद्यासाठीच अनुदान देण्यात येणार असे जाहीर केले. ही शेतकऱ्यांची शासनाने एक प्रकारे थट्टा केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी खरीपातील लाल कांदा पिकवला व बाजार समिती मध्ये विकला त्यांच्याकडे शेताचा उतारा आहे. त्यांच्या ७/१२ उतार्यावर ऑनलाईन नोंद असो किंवा नसो त्यांना मदत मिळने गरजेचे आहे. परंतु सरकार किचकट अटी शर्ती मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असे एकंदरीत चित्र आहे. यामध्ये स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांची काही चुक नसते कारण अशा आसमानी संकट येते त्यावेळी शासनाने त्यांना राज्यातील कोणत्या भागातून किती टक्के नुकसान दाखवायची याबाबत सुचना देण्यात आलेल्या असतात.
नाशिक जिल्ह्यातील गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून अतिशय भयंकर प्रकार घडला आहे.उद्या छत्रपती संभाजी नगर, बीड जिल्ह्यातील व इतर ठिकाणी देखील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून विधानसभेत शेतकरी बांधवांना तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार सिध्दार्थ मोरे कृषी अधिकारी जगदीश पाटील गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नहार, संतोष बळीद, संजय कटारिया, प्रविण सुर्यवंशी, विजय मिश्रा, बाळासाहेब चव्हाण, अमित नहार, राजेंद्र सोनवणे, रामदास पाटील, आयुब शेख, नाना थोरात, शिवसेना तालुकाप्रमुख कन्नड संजय मोटे, जालिंदर गायकवाड, ऊप तालुकाप्रमुख अजय जाधव, बाबासाहेब शिंदे, निपाणीचे सरपंच पंढरीनाथ कदम उपविभाग प्रमुख, ज्ञानेश्वर बोरसे, बळीराम बोरसे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.