loader image
[ays_poll id=7]

मनमाड करांनो पाणी जपून वापरा – महिन्यातून एकदाच होणार पाणीपुरवठा

May 1, 2023


मनमाड शहरातील तमाम नागरीकांना कळविण्यात येते की, मनमाड शहरास पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणात सद्यस्थितीत अत्यल्प पाणी साठा शिल्लक असुन वागदर्डी जलशुध्दीकरण केंद्रास अँव्हटीने 100 टक्के क्षमतेने पाणी पुरवठा होत नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात नैर्सगिकरित्या पाणी पुरवठा 15 से 17 दिवसांवर होत आहे. पालखेड धरणातून आरक्षित बिगरसिंचनाचे पाणी माहे मे मध्ये मिळणे अपेक्षित आहे. परंतू “अल-निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे संभाव्य पावसाळा उशिरा व कमी होणार असल्याचे संकेत देऊन बिगरसिंचन आवर्तनाचे पाणी उशिरा उपलब्ध होणार असल्याने उपलब्ध पाणीसाठा माहे ऑगष्ट 2023 अखेरपर्यन्त पुरवावे असे स्पष्ट निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अत्यंत काटकसरीने व नियोजनबध्द वितरीत करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा शहरास तीव्र टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनास नाईलाजास्तव शहराच्या पाण्याच्या वितरण दिवसामध्ये साधारणतः 4 ते 5 दिवसांची वाढ करावी लागत असुन माह में 2023 मध्ये साधारणतः 19 ते 21 दिवसानंतर पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी उपलब्ध होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यांत येईल. नागरीकांच्या होणा-या गैरसोईबद्दल दिलगीरी व्यक्त करीत असून भविष्यात निर्माण होणा-या भिषण पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाय योजनांना नागरीकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो. तरी नागरीकानी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच प्यावे, पाण्याच्या अपव्यय करु नये, पाणी गळती वेळीच थाबवावी, याबाबत मनमाड नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.


अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
.