loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष साजरा

May 6, 2023


केआरटी शाळेत लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. सौ संगीता सनस यांनी शाहू महाराजांविषयी आपले विचार मांडले.संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत दीन शोषितांचे तारणहार थोर समाज सुधारक लोकराजा शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थांचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घराण्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते. शाहू राजांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव (अप्पासाहेब) हे होते. कोल्हापूर संस्थान चे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या चौथ्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतराव ला दत्तक घेतले त्यांचे ‘शाहू ‘असे नामकरण केले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी मिसर सर यांनीआपले विचार मांडले. शाहू महाराज हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे लोकप्रिय होते. सन 1889 ते 1893 या काळात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले 1 एप्रिल 1891 रोजी शाहू महाराज लक्ष्मीबाईशी विवाहबद्ध झाले.
इसवी सन 1894साली शाहू महाराज यांनी संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. कार्याचा उद्देश समाज परिवर्तन घडवणे हा होता. त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी सोनतळी येथे भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण. आरोग्य. कृषी.उद्योग कला क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. आपण सर्व शाहू महाराजांना लोक कल्याणकारी राजा म्हणून ही ओळखतो दुर्दैवाने 6 मे 1922 रोजी मुंबई येथे शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला.
कार्यक्रमाला शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता कदम देसले यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.