loader image
[ays_poll id=7]

बारावी सीबीएसई निकाल जाहीर – यंदाही मुलींनीच मारली बाजी

May 12, 2023


बारावी सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन cbse.gov.in आणि

cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.

निकाल कसा पाहाल?

• CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा

cbse.gov.in ला भेट द्या. मेन पेजवर, ‘CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक’ वर क्लिक करा.

लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांना रोल नंबर

आणि जन्मतारीख एन्टर करावी. तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.

• विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात.

CBSE इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रात्यक्षिक आणि थिअरी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान 33 टक्के गुण असणं आवश्यक आहे.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.