मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे दुपारी दुचाकीचा अपघात झाला. यावेळेस त्यामार्गे जाणारे नांदगाव चे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित मदत करत तात्काळ ॲम्बुलन्सला पाचारण करत जखमींना पुढील उपचारासाठी मनमाड येथे पाठवले. या अपघातातील जखमी हे निफाड तालुक्यातील आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता दुचाकी वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आवाहन केले आहे.
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...









