loader image
[ays_poll id=7]

कत्तलीसाठी आणलेली जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत केला गुन्हा दाखल

Jun 30, 2023


बकरी ईद सणानिमित्त कत्तलीसाठी गोवंश जनावरांची चोरटी वाहतूक करतांना आणि शहरातील खदानी जवळ कत्तलीसाठी बांधून ठेवलेली अशा दोन्ही ठिकाणी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या ५ गायी, ६ बैल आणि ३४ गो-हे असे एकूण ४५ गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांसह अज्ञाताविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत अकरा लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील पांझन नदीच्या किनारी एफसीआय जवळ असलेल्या खदान शेजारी आज सकाळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने कत्तलीसाठी ५ गायी व ३४ गो-हे असे ३९ गोवंश जनावरे आणुन त्यांना त्रास होईल अशा प्रकारे दोरखंडांनी निर्दयतेने बांधुन ठेवले होते. सदर ठिकाणी छापा टाकून सदर जनावरे ताब्यात घेण्यात आली. सुमारे ६ लाख रुपयांच्या जनावरांची सुटका पोलिसांनी केली आहे. याबाबत अज्ञाता विरुद्ध पोलिस कर्मचारी समाधान देशमुख (वय ३१ वर्षे) यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर शहरातील मालेगाव नाका येथे नाकाबंदी केली असता प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवंश असलेली जनावरे कत्तली साठी रस्त्याने नेली जाणार होती. त्यानुसार येवला – मालेगाव रस्त्याने एक महींद्रा बोलेरो पिकअप नंबर एम. एच. ४८ ए. जी. ५०६७ ही गाडी येवला बाजूकडून मालेगावकडे गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी घेवून जात असताना गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीची ६ बैल पिकअप गाडीमध्ये दोराच्या साहाय्याने जखडलेल्या अवस्थेत एकमेकांच्या पायात पाय अडकलेले असे बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर बैलांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. यावेळी पिकअप चालक मतीन मेहमूद मुलतानी (वय ३९ वर्षे रा. निहारखेडा ता. येवला) आणि त्याच्या सोबत असलेला दुसरा इसमास भिमराज वसंत जठार (वय ३० वर्षे रा. सायगाव ता. येवला) यांना ताब्यात घेतले असून ६ जनावरे आणि पीकप गाडी असा ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संजय ठाकरे (वय ५३ वर्षे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.