शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत बारा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले. धुळ्याचे एसपी संजय बारकुंड यांनी सांगितले की, या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर गावात मंगळवारी सकाळी घडली. महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या डंपर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडकून बसस्थानकावर धडकली.
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...









