loader image
[ays_poll id=7]

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे – मनमाड च्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jul 6, 2023


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे मनमाड चे माजी आमदार राजाभाऊ देशमुख, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हा प्रमुख नाना शिंदे, भैयासाहेब देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची निकड व भावना आपण स्वतः: आरक्षणाच्या लढ्यातील योध्दे असल्याने जाणून आहात. परंतु न्यायालयीन लढयात तांत्रिक अडचणींमुळे आलेल्या अपयशामुळे संपूर्ण समाज हा प्रचंड निराशेच्या गर्तेत गेला आहे. शैक्षणिक आरक्षण नसल्यमुळे युवक वर्ग हा हताश झाला आहे. व त्याचा परिणाम स्वरूपी व्यसन, गुन्हेगारी तसेच आत्महतेसारख्या विचाराप्रत पोहोचत आहे. दिवसेंदिवस समाजाची परिस्थिती बिकट होत आहे. कुणबी व मराठा एकच असल्याचे विविध आयोगामार्फत सिद्ध होऊनही कायद्याच्या कचाट्यात हा विषय अडवून पडला आहे.

आपल्या सरकारच्या कामाचा वेग व न्याय देण्याच्या पद्धतीचा विचार करता आपल्या सरकारकडून यावर निश्चित मार्ग निघेल, अशी अपेक्षा समाजाला आपल्याकडून आहे. या लढ्यात ९२ सालापासून संघर्षमय प्रवास आमचा सुरु आहे व त्यासाठी आयोगाकडे सर्व नांदगाव तालुक्यातील सर्व विविध समाजांचा पाठिंब्याचे पत्र असलेल्या फाईल्स दाखल केलेल्या आहेत. तरी आपण न्यायालयीन प्रक्रियेत व्यक्तिशः लक्ष देऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.

अशी संपूर्ण मराठा समाजाची आपल्याकडून अपेक्षा आहे. यासाठी केंद्राकडेही पाठ पुरवठा करावा अशी कळकळीची विनंती सकल मराठा समाज नांदगाव तालुक्यातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...

read more
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...

read more
बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

नांदगांव : मारुती जगधने पांझण (धोटाणे) ता नांदगाव येथील ग्रांमपंचायतीने गावातील महीलासाठी बांधलेले...

read more
.