loader image
[ays_poll id=7]

समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्य : राजेंद्र पगारे

Jul 18, 2023


 

मनमाड(प्रतिनिधी):- गेल्या सोळा वर्षांपासून अनेक अडीअडचणीचा सामना करत अनेकांचा विरोध पत्करत फुले शाहु आंबेडकर यांच्यासह इतर सर्वच महापुरुषांच्या समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे तसेच तळागाळातील घटकापर्यंत पोहचवण्याचे काम फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच करत असुन आता भविष्यात नांदगाव तालुक्यासह जिल्हाभर हेच काम नव्या पिढीने करावे असे प्रतिपादन मंचचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी केले मंचच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी नुतन कार्यकारणीला नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी पगारे यांनी भारतात सुरू असलेल्या सद्यस्थितीबाबत वक्तव्य करत आता भविष्यात फ़ुले शाहु आंबेडकर यांच्याच समतावादी विचारांची गरज असुन ते जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. आज फ़ुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हाजी रफिक बाबुजी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशनचे झोनल सचिव सतिष केदारे,सिटू संघटनेचे नेते रामदास पगारे,मंचचे अध्यक्ष मिरझा अहमद बेग,हाजी शफीक,मौलाना तौसिफ,रईस मंसुरी, हाजी मुश्ताक सर,मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख,येवला येथिल सबुरभाई मोमिन आदीजन उपस्थित होते.यावेळी सतिष केदारे यांनी आपल्या भाषणात संविधानांमुळे आपण सर्व एक आहोत त्यामुळे आपण देखील एकत्रित राहुन आपले संविधान कसे वाचवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले तर मौलाना तौसिफ यांनी आपल्या भाषणात फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे काम हे मानवतावादी असुन आपण इतर माणसांना माणुसकी म्हणुन मदत करणे हेच सर्व धर्म सांगतो व आपल्या संविधानात देखील माणुसकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे असे सांगितले. यावेळी गोपी कौराणी, आशिष भंडारी, अमोल पवार,ज्ञानेश्वर शिंदे,आमिन नवाब शेख,जावेद मंसुरी, शरद बहोत, सद्दाम आतार, जावेद शेख, इस्माईल पठाण,विनोद आहिरे,शकुर शेख, यांच्यासह इतर जणांना नविन पद देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आहिरे यांनी केले तर फिरोज शेख यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
.