loader image
[ays_poll id=7]

मणीपुर घटनेच्या निषेधार्थ नांदगावला मुक मोर्चा

Jul 27, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
मनीपुर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात “आम्ही भारताचे लोक ” हा बॅनर लावून नांदगाव कराच्या वतीने आज मूक मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या क्रूर घटनेमुळे भारतीय समाजासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचा सामना करून संविधानिक मूल्य बळकट करणे आवश्यक आहे.याचा विचार करून त्यासाठी नांदगाव शहरात आम्ही भारताचे लोक या नावाने मूक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली होती. ही रॅली नांदगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी मणिपूरच्या अत्याचाराच्या विरोधात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या वेळी प्रशासन नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना आम्ही भारतीय लोक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नांदगाव मधील सुजाता महिला मंडऴ,रमाई मित्र मंडऴ, आदिवासी जनसमुदाय, एकलव्य संघटना, आधार बहुदेशीय संस्था, वंचित बहुजन आघाड़ी चे वाल्मीक जगताप, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज चोपड़े,शिवसेनेचे अँड सचिन साऴवे, आर .पी. आयचे महावीर जाधव ,अँड विद्या कसबे ‘ अलका रूपवते वाकोडेताई ‘ तानसेन जाधव ‘ राजू गुडेकर, अनिल जाधव ,विश्वास आहिरे, अरुण साऴवे,व असंख्य आर पी आय चे कार्यकर्त, महिला वर्ग या घटनेविरुध्द एकत्र येऊन या मूक मोर्चात मोठया संख्येने सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.