loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Aug 1, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतातून डॉ सुभाष निकम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य केले. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी टिळकांनी जहाल विचारसरणीचा अवलंब करून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या “अपूर्व दत्तक योजनेमध्ये” महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला या योजनेअंतर्गत लाभार्थीं विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ सुभाष निकम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप ढमाले यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...

read more
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...

read more
.