loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Aug 1, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतातून डॉ सुभाष निकम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य केले. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी टिळकांनी जहाल विचारसरणीचा अवलंब करून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या “अपूर्व दत्तक योजनेमध्ये” महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला या योजनेअंतर्गत लाभार्थीं विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ सुभाष निकम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप ढमाले यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

मनमाड :- नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
.