loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करावा – शिवसेना (उबाठा) गटाची मागणी

Aug 25, 2023


नांदगांव तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नांदगांव तालुक्यात हवा तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगांव तालुक्यात
दुष्काळाची गंभिर स्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकरी, नागरीक, कामगार व इतर घटकांना याचा
खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मुख्यतः शेतकऱ्यांचे यामध्ये खुप मोठे नुकसान झालेले आहे व होत आहे. तरी

या बाबींचा विचार करता नांदगांव तालुक्यात त्वरीत दुष्काळ जाहिर करावा अशी शासनाकडे त्वरीत मागणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार मोरेंकडे करण्यात आली आहे.
तसेच तालुक्यातील शेतकरी, नागरीक, कामगार व इतर घटकाचे विविध मागण्या देखिल लवकरात
लवकर पूर्ण करणेकामी शासन स्तरावरून योग्यती कार्यवाही करावी व याबाबत शासनास अवगत करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दुष्काळाचे गंभिर समस्येमुळे शेतकऱ्यांनी पेरलेले पिक येऊ शकलेले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसाणीची नुकसान भरपाई मिळावी.
अनेक गावांमध्ये पिण्याचे पाण्याची गंभिर समस्या उद्भवत आहे, त्या गावांना तात्काळ टैंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा.
दुष्काळामुळे जनावरांचे देखिल चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जनावरांसाठी तालुक्यात ठिक-ठिकाणी चारा छावण्या सुरु करणेत याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभागामध्ये...

read more
आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यातर्फे आज मनमाड येथील संपर्क कार्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित...

read more
मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समाजात आपला स्टेटस निर्माण करावा : श्रीमती विजया हंडोरे

मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समाजात आपला स्टेटस निर्माण करावा : श्रीमती विजया हंडोरे

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ....

read more
सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

  आपल्यातील बऱ्याच जणांना कुठलेही सामान विकत घेतल्यावर विक्रेत्यांकडून बिल घेण्याची सवय असते....

read more
.