loader image
[ays_poll id=7]

संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज – सुनीता राजगिरे

Nov 29, 2023


मनमाड – “सृष्टीतील सर्व प्राणीमात्रात मानव प्राणी श्रेष्ठ आहे आणि मानव प्राण्यात स्त्री ही पुरुषापेक्षा जादा श्रेष्ठ आहे. कारण ती पुरुषापेक्षा जादा काम करते. परंतु पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने धार्मिक पोथ्या पुराणातील कायद्यांनी तिला गुलामित ठेवलेले आहे. म्हणूनच स्त्रियांना या गुलामीतून मुक्ती देण्यासाठीच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. तेच आद्य शिक्षक आहेत,” असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या सुनीता राजगिरे यांनी केले.
मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव समिती यांच्यातर्फे आयोजित महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुनिता राजगिरे बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की,” स्त्री शिक्षणाचा पाया रचून संपूर्ण समाजाला समतेच्या वाटेवर नेण्याचे महान कार्य करणारे महात्मा फुले खऱ्या अर्थाने समाज क्रांतिकारक असून त्यांचा समतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मुख्य गाभा बनविलेला आहे. म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. ”
कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कांबळे, पंचशील वाचनालयाचे संचालक एस. एम. भाले यांनीही आपले विचार मांडले. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ गायक अर्जुन साळवे यांनी सामाजिक समतेची गीते गायली. प्रास्ताविक सुशांत केदारे आणि आभार अशोकआप्पा परदेशी यांनी प्रदर्शित केले. संयोजन रामदास पगारे यांनी केले. यावेळी शंकर सानप,शरद बोडके,मोतीराम भालेराव, गौतम कर्डक, सूर्यकांत राजगिरे, श्री.आव्हाड, राजेंद्र धिंगाण, पांडे बाबूजी, मनोहर जगताप, श्री. घुगे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.