loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात “परीक्षा पे चर्चा” विषयावर व्याख्यान

Feb 2, 2024



मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली “परीक्षा पे चर्चा” या विषयावर श्री अविनाश पारखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
श्री अविनाश पारखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी परीक्षेची अनावश्यक भीती घेऊ नये, तसेच परीक्षेच्या काळामध्ये योग्य आहार, व्यायाम, मेडिटेशन करावे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास मनावर दडपण येत नाही असे मनोगत केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस सामोरे जाताना मेहनत व वेळेचे नियोजन यांची योग्य सांगड घालून परीक्षेला सामोरे गेले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा दिलीप कातकडे, प्रा. आय. एम खान, प्रा. व्हीं ए दासनूर, महाविद्यालयातील प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्ही आर फंड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा अमोल देसले व आभार प्रा सुनील बच्छाव यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.