मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
नांदगाव मारुती जगधने 166 दिवसानंतर माजी मंत्री छगन भुजबळांचे मंत्रिमंडळामध्ये वर्णिले लागले...









