loader image

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

May 27, 2024


 

मनमाड – शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही मार्गाने फसवणूक झाली.
सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक शेतकरी, नोकरदार,पेन्शनर,व्यापारी आहेत.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बॅंक प्रशासनाने तडका फडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्या. ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाई घाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखाप्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला. ग्राहकांची झालेली फसवणूक व हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यामुळे आधीच दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे हतबल झालेल्या ग्राहकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडे धाव घेऊन आमदार साहेबांना लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपणच या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन न्याय मिळवून आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ग्राहकांनी साद घातली. त्याला प्रतिसाद देत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे शब्दाला जागत आज दिनांक 25/5/24 रविवार रोजी सायंकाळी अनेक पीडित ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांचेकडे आमदार कार्यालयातील सहाय्यता कक्षात लेखी तक्रार दिलेल्या सर्व ग्राहकांच्या वतीने आमदार सुहास आण्णांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन तक्रार दाखल केली.
सदरील तक्रारीत आमदारांनी विमा एजंट सुधीर देशमुख सोबतच युनियन बँक प्रशासनास दोषी मानत, याची सर्व जबाबदारी ही बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तशी तक्रार दाखल केली. त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहनही त्यांनी बँक प्रशासनास केले आहे.
मात्र 8 दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नासिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिसबाहेर दरवाज्यातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिला आहे.
याप्रसंगी पीडित ग्राहकांनी दिलासा व्यक्त करत आमदार कांदे यांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
.