loader image
[ays_poll id=7]

सरदार पटेल रोडचे ‘शुक्लकाष्ट’ कधी संपणार?

Jan 8, 2026


मनमाड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या सरदार पटेल या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून मुख्य बाजारपेठेतील जवळ जवळ सर्वच रस्त्यांची कामे झालेली असली तरी सरदार पटेल रोडचे काम अद्याप का होत नाही ? असा सवाल सरदार पटेल रोडवरील व्यापारी तसेच नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मनमाड रेल्वे स्थानक ते प्रगती कॉर्नर ह्या रस्त्याची झालेली दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि धुळीचे प्रचंड साम्राज्य या विवंचनेतून आपली सुटका कधी होईल? असा प्रश्न या भागातील रहिवाशांना सतावत आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा प्रमुख मार्ग असून रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीचे असलेले साम्राज्य या प्रमुख कारणांमुळे शहरातील नागरिकही या रस्त्याने जात नसल्यामुळे या मार्गावरील दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.

नगर प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा ज्या दिवशी होतो तेव्हा रस्ता पूर्णपणे जलमय होतो व त्यामुळे रस्त्यातील खड्डे लक्षात न आल्याने अनेक अपघात घडतात. माणके कंपाउंड मधील जैन बांधवाना जैन स्थानकात जाण्यासाठी रोजच या मार्गाचा वापर करावा लागतो मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्रामुख्याने या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरू करतील आणि त्यांच्या रोजच्या जीवनातील दयनीय अवस्थेत असलेला खड्डेमय रस्त्याचे शुक्लकाष्ट संपवतील असा आशावाद ह्या परिसरातील नागरिक,ज्येष्ठ नागरिक, व्यापारी शाळकरी विद्यार्थी आणि जैन स्थानकात जाणाऱ्या भाविकानी व्यक्त केला आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.