loader image
[ays_poll id=7]

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

Feb 25, 2026


मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य गुरुद्वारा असून येथे देशातील अनेक राज्यातून शिख बांधव आणि विविध जाती,धर्म आणि पंथातील भाविक नियमित येत असतात.

शिख धर्मामध्ये ‘गुप्तसर साहिब गुरुद्वारा’ नावाने मनमाड गुरुद्वाराची ओळख असून गुरुद्वाराला मोठा धार्मिक इतिहास देखील आहे. सध्या मनमाड गुरुद्वाराच्या नवीन
दरबाराचे काम सुरु असून भव्य स्वरूपात नवीन गुरुद्वाराची निर्मिती होत आहे.भविष्यामध्ये भव्य आणि तितक्याच आकर्षक पणे निर्माण होणाऱ्या या नवीन गुरुद्वारा मुळे मनमाड शहराची आणखी एक नवीन ओळख ही शिख धार्मियांचे तीर्थस्थळ म्हणून होईल यात शंका नाही.

मनमाड गुरुद्वारामध्ये नेहमीच शिख धर्मीय भाविकांन बरोबरच इतर धर्मीय भाविक देखील येत असतात, परंतु अनेक वेळेला असे आढळून येत आहे की काही भाविकांनकडून गुरुद्वारातील नियमांचे पालन न करता येथील पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो.

या विषयी मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांनी गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भाविकांनी आवाहन केले आहे की, मनमाड गुरुद्वारामध्ये शिख बांधवांन बरोबरच समाजातील सर्व जाती,धर्मीय आणि प्रत्येक घटकांचे सदैव स्वागतच आहे, गुरुद्वारामध्ये अनेक वेळेला साजरे होणारे धार्मिक उत्सव, लंगर-प्रसाद यात भाविकांनी सहभागी होऊन यांचा लाभ घ्यावा, परंतु यात सहभागी होतांना गुरुद्वाराच्या नियमांचे पालन करून येथील पावित्र्य भंग होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

गुरुद्वाराच्या परिसरामध्ये प्रवेश करतांना भाविकांनी आपल्या डोक्यावर कपडा बांधणे, कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ, गुटखा,दारू यांचे सेवन करून आतमध्ये न येणे, गुरुद्वारामध्ये साजऱ्या होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त गुरुद्वारा परिसराध्ये इतर कोणत्याही प्रकारचे फोटो शुट अथवा रील काढू नये, पारंपारीक कपडे परिधान करणे इत्यादी प्रकारच्या नियमांचे भाविकांनी पालन करून गुरुद्वाराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हान गुप्तसर साहिब गुरुद्वारा मनमाडचे प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
.