loader image
[ays_poll id=7]

मनमाडला अंडरपास व फ्लायओवरची अत्यंत गरज : आ.कांदे यांची रेल्वे बोर्डाला मागणी

Mar 1, 2026


मनमाड- दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली येथील कार्यकारी निदेशक (बी अँड एस)-1 मा. अभिमन्यु लोबा यांना मनमाड शहरातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

मनमाड जंक्शन हे मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे केंद्रबिंदू असून, दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी व वाहने येथे ये-जा करतात. शहराच्या पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा पुराणा रेल्वे पूल नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत असून, येथे सतत वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय तसेच ॲम्बुलन्स व अग्निशमन सारख्या आपत्कालीन सेवांना गंभीर अडथळा निर्माण होत असल्याचे आमदार कांदे यांनी निवेदनात स्पष्ट केले.

शहराचा वेगाने वाढता विस्तार आणि भविष्यातील ट्रॅफिकचा विचार करता, ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मनमाडकरांना सुरक्षित व सुगम मार्ग उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आ. कांदे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या :

१) मनमाड रेल्वे जंक्शनच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला स्वतंत्र अंडरपास तातडीने बांधकाम करावे.

२) भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रेल्वे लाईनच्या वर फ्लायओवर उभारण्याची योजना प्राधान्याने हाती घ्यावी.

ही कामे मनमाड शहराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असून, नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार त्यांनी निवेदनाद्वारे केला.

रेल्वे बोर्डाने या संदर्भात सकारात्मक पावले उचलून तातडीने कार्यवाही करावी, अशी मांगणी आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी केली असताना मा. अभिमन्यू लोबा यांनी रेल्वे बोर्डाच्या इतर सदस्य ची चर्चा करून लवकरच या विषयात उचित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या प्रसंगी नगराध्यक्ष योगेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, नगरसेवक माजिद शेख, आझाद पठाण, लाला नागरे, लोकेश साबळे, सनी स्वामी, आसिफ पठाण, निलेश व्यवहारे आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.